तुमचं मन शांत कसे कराल? उत्तर ‘साक्षीभावा’ ने ! अंतर्मनात डोकावण्याची एक वाट- ‘साक्षीभाव’ समजुन घ्या या लेखात !

तुमचं मन शांत कसे कराल? अर्थात मनाची शांती हरवलेलं आजचं जग आहे.प्रत्येकाला टेंशन आहे.कुणाला पैशाचे,कुणाला कामाचे,कुणाला कौटुंबिक, कुणाला आजाराचे,कुणाला बेरोजगारीचे,कुणाला परिक्षेचे,कुणाला देणेदारीचे,कुणाला बायकोचे,कुणाला नवर्याचे,कुणाला गर्लफ्रेंडचे,कुणाला बायफ्रेंडचे,कुणाला महागाईचे,कुणाला राजकारणाचे,कुणाला स्पर्धेचे,कुणाला धंद्याचे,कुणाला प्रेमाचे तर कुणाला आणखीन कशाचे ! एक ना अनेक कारणांनी माणुस मनाची शांती हरवुन बसला आहे ! तो त्याची ही ‘शांती’ अनेक गोष्टींमधे शोधण्याचा प्रयत्न करत आहे.कोणी ती नशेमधे,कोणी ती आशेमधे,
कोणी खाण्यामधे,कोणी पैशामधे,कोणी राजकारणात,कोणी मंदिरात,कोणी प्रवासात ,कोणी ती ‘भाईगिरीत’! तर कोणी ती
संभोगात शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तरी मनाला शांतता काही मिळेना !